Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 29/3/2026 गृहं तु गृहिणीहीनम्

“न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते । गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ।।”

केवळ घर असल्याने त्याला घर म्हणत नाहीत; तर गृहिणीच (सांसारिक जीवनाची स्त्रीसत्ता) खऱ्या अर्थाने घराला घरपण देते. जर घरात गृहिणी नसेल, तर ते निर्जन वनाहूनही अधिक भयावह असते. या श्लोकात गृहिणीच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. घर हे केवळ विटा-मातीने बनलेले नसते, तर गृहिणीच्या उपस्थितीमुळेच त्याला घरपण मिळते. गृहिणी म्हणजे संस्कार, स्नेह, आणि सौख्याचा आधार, जी घराला उर्जित ठेवते. जर स्त्री नसेल, तर त्या घरात आत्मियता आणि सौंदर्य नसते, आणि त्यामुळे ते जंगलासारखे निर्जीव वाटते.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏🌹

RELATED ARTICLES

Most Popular