विचार क्रांती न्यूज
विचारांची क्रांती म्हणजे विचार क्रांती.
ई-पेपर
दिनांक: 14 जुलै 2026 | मंगळवार | वर्ष 2| अंक: 195 | पाने: 6
संपादक: अंबादास वसंतराव देशमुख
संपर्क: 9850579876 | http://www.vicharkrantinews.com
ठळक बातम्या
1. उदगीर शहरात वाहतुकीची कोंडी, जनता परेशान
शिवाजी चौक, देगलूर रोड, उमा चौक या ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी व सायंकाळी नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.
2. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात
15 दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर, कापूस पिके सुकू लागली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वेळीच पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता.
3. उदगीर-देगलूर बस टाकळी येथे थांबत नाही
एसटी बस टाकळी गावात थांबत नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
विस्तृत बातम्या
उदगीर शहरात वाहतुकीची कोंडी
उदगीर शहरातील मुख्य चौकांमध्ये सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शिवाजी चौक, देगलूर रोड आणि उमा चौक येथे वाहने रांगेत उभी राहतात. वाहतूक पोलिसांची संख्या कमी आणि अनधिकृत पार्किंगमुळे समस्या वाढली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पावसाअभावी शेतकरी चिंतेत
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पेरणी झालेल्या शेतात ओलावा नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बस न थांबल्याने प्रवासी हैराण
उदगीर ते देगलूर जाणारी एसटी बस टाकळी येथे थांबत नसल्याने शाळकरी मुले व कामगारांना 2-3 तास वाट पाहावी लागत आहे. अनेकदा तक्रार करूनही बस आगाराकडून दखल घेतली जात नाही.
कार्यालय: टाकळी वागदरी, ता. उदगीर, जि. लातूर
Email: [email protected].