लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/2/2026 आज माझे भाचे श्री. रविकिरण नितुरकर यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
त्यांना भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.रविकिरण निटुकर हे आपल्या हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने आपले ध्येय साध्य केले.आपले सुध्दा कुठेतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून आपल्या उदगीर मध्ये मोठ्या थाटामाटात नवतरुण विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
मेट्रो शहरांकडे धाव न घेता, ग्रामीण भागातच रोजगार निर्माण करण्याचा त्यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.
मागील ३ वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील सुमारे ४०० तरुणांना रोजगार मिळाला आहे.
आई भवानी त्यांच्या या समाजोपयोगी कार्याला उदंड यश देवो, हीच मनापासून प्रार्थना 🙏