लातूर प्रतिनिधी दिनांक 14/4/2026दुःखगृहवर्णनम्
“माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी। अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥”
ज्याच्या घरात आई नाही आणि पत्नी कटू किंवा अप्रिय बोलणारी आहे, त्याच्यासाठी ते घर म्हणजे जंगलासारखेच आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने जंगलात जाणे अधिक योग्य ठरते, कारण जिथे आपुलकी, प्रेम आणि शांतता नाही, ते घरही अरण्यासारखेच कठीण आणि दुःखदायक वाटते. या श्लोकातून घरातील स्नेह, सौम्यता आणि आपुलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏