लातूर प्रतिनिधी दिनांक 6/5/2026 त्रिरत्नमहिमा
“पृथ्वियां त्रीणि रत्नानि जलमन्नम सुभाषितं। मूढ़े: पाधानखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते।।”
या पृथ्वीवर तीनच खरे रत्न आहेत—पाणी, अन्न आणि सुभाषित (सुंदर व हितकारक वचन). परंतु मूर्ख लोक दगडांच्या तुकड्यांना (माणिक, हिरे इत्यादींना) रत्न समजतात. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनासाठी खरोखर उपयुक्त आणि आवश्यक असलेल्या गोष्टींचेच खरे महत्त्व आहे, तर बाह्य चमकदार वस्तूंना खोटे महत्त्व दिले जाते. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏